अमरावती :-
अमरनाथ यात्रेवर झालेल्या भ्याड आक्रमणाचा आम्ही निषेध व्यक्त करत आहोत. आज आपल्या देशाचे दुर्दैव हे आहे, की राष्ट्रभक्त सरकार येऊनही आपल्याला निषेध व्यक्त करावा लागत आहे. हिंदु बांधव आपल्या जीवावर उदार होऊन यात्रेला जातात आणि जिहादी आतंकवादी आक्रमणे करतात, तरी सरकार काहीही करत नाहीत. मानव अधिकार वालेही काहीही बोलत नाही. आज खऱ्यां अर्थाने राष्ट्रभक्त हिंदूंनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. सरकारने लवकरात लवकर आतंकवादी आक्रमणाचे उत्तर द्यावे. अन्यथा ठिकठिकाणी हिंदु एकत्र येऊन आंदोलन करू, अशी चेतावणी बजरंग दल आणि विहिंप यांनी अमरनाथ यात्रेवर झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या विरोधात घेण्यात आलेल्या आंदोलनाच्या वेळी दिली. हे आंदोलन बजरंग दल आणि विश्व् हिंदू परिषद यांच्या वतीने अमरावती येथे राजकमल चौकात निदर्शने करण्यात आली यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद चे नारेही देण्यात आले.