शहरात वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न

0
562
Google search engine
Google search engine



चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )



राज्य शासनाने `एकच लक्ष्य-दोन कोटी वृक्ष’ या संकल्पानुसार संपूर्ण राज्यभरात लोकसहभागातून वृक्षलागवडीचे `हरित मिशन’ राबविले आहे. या मिशनला शहरात उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
    शहरातील शिवाजी नगर परीसरासह अनेक ठिकाणी राज्य शासनाच्या दोन कोटी वृक्ष लागवडीच्या योजनेअंतर्गत शनिवारी नगर परीषदेतर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिवाजी नगर परीसरात नगराध्यक्ष निलेश सूर्यवंशी, उपाध्यक्ष देवानंद खूने, विरोधी पक्ष नेता संजय मोटवानी, गटनेता वैभव गायकवाड, सभापती महेश कलावटे, सतपाल वरठे आदींनी वृक्षारोपण केले. पाणी टंचाईवर मात आणि पर्यावरणाचे रक्षण करणे यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायले हवेत असे मत उपस्थित मान्यवरांनी केले. यावेळी सर्व नगरसेवक, नगर परीषदेचे कर्मचारी, न.प. शिक्षक, नागरीक, विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.