अमरावती – येथील ‘धर्मप्रचार सभा’ या न्यासाच्या वतीने भारतरत्न राजीव गांधी मराठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वहीचे वाटप करण्यात आले. शाळेतील शिक्षकांनी या उपक्रमाच्या सिद्धतेसाठी साहाय्य केले. मुख्याध्यापिका सौ. एकलारे यांनी कार्याचे कौतुक केले आणि शाळेत बालसंस्कारवर्ग चालू करण्याची मागणी केली.