मराठा क्रांती मोर्चासाठी रेल्वेच्या प्रत्येक गाडीला ज्यादा डबे

0
996
Google search engine
Google search engine

येत्या ९ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मुंबईत मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येत आहे. राज्यातून लाखों लोक मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्रासह शेजारील राज्यातून मुंबईत पोहोचणाऱ्या रेल्वे गाडयांना ज्यादा डबे जोडण्याची खासदार संभाजीराजे छत्रपती यांची मागणी रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी तातडीने मंजूर केली. संभाजीराजे यांच्या या प्रयत्नाला यश मिळल्याने हजारो मराठा मोर्चेकऱ्यांना मुंबईत मोर्चासाठी येणे सोपे होणार आहे. 

या मोर्चासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखों लोक सहभागी होणार आहेत. त्यांना मुंबईत रेल्वेने तातडीने पोहचण्यासाठी प्रत्येक गाडीच्या डब्याला अतिरिक्त डबे वाढवून देण्यासह परतीच्या प्रवासासाठी ज्यादा डबे जोडावे अशी मागणी संभाजीराजे यांनी केली होती. तोंडावर आलेल्या या मोर्चाचे गांभीर्य लक्षात घेवून प्रभुनीं ज्यादा डब्याची व्यवस्था करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.