बालाजी यात्रेला पावसाच आगमन – रथ नदीतून बाहेर निघताच पावसाला सुरुवात

0
493
Google search engine
Google search engine

बादल डकरे //चांदुर बाजार-

चांदुर बाजार तालुक्यातील देऊरवाडा येथील तीन दिवशीय बालाजी यात्रा महोत्सव ला दिनांक 5 ऑक्टोबर पासून सुरुवात झाली.आज दिवसभराचा सांप्रदायिक कार्यक्रम पार आणि आज सायंकाळी पाच वाजता बालाजी यांच्या रथा समोर भजनाला सुरुवात झाली.या यात्रे दरम्यान दिंडी ,मनोरंजन यावेळी देऊरवाडा आणि काजळी तसेच तालुक्यातील भाविकांनी याचा आनंद लुटला.

यावेळी शिरजगाव कसबा चे ठाणेदार मुकुंद कवाडे यांनी सुद्धा आपल्या कर्मचारी आणि अधिकारी याचा चांगला बंदोबस्त दिला होता.

रथ पाण्यामध्ये जाण्याअगोदर मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी यावेळी पाहायला मिडळी.त्यातर बालाजी यांचा रथ पाण्यामध्ये गेला आणि भाविकांनी आरती म्हटली.गोविंदा गोविंदा च्या जय घोषाने संपूर्ण देऊरवाडा येथील पूर्णा नदीच्या काठावरील सर्व परिसर दुमदुमून गेला.तसेच बालाजी याचा रथ नदीच्या पात्राच्या बाहेर निघताच दमदार पावसाला सुरुवात झाली.त्यामुळे सर्व भाविकांना ओले व्हावे लागले.