वसुलीच्या गोष्टीवरून आपआपसात पोलीस भिडल्याची चर्चा
ठाणेदारांचे कर्मचाऱ्यांवर नाही नियंत्रण
एकमेकांवर लाठीकाठीने हल्ला
चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )-
जनतेची सुरक्षा वाऱ्यावर सोडून अमरावती जिल्ह्याच्या चांदुर रेल्वे पोलीस ठाण्यात चक्क पोलिसांनीच एकमेकांवर काठीने हमला केला . कर्तव्यावर असतांना कोणताही सार्वजनिक कार्यक्रमाची परवानगी नसते. मात्र चांदुर रेल्वे पोलिसांची ठाण्यातच कोजागिरी पौर्णिमेची पार्टी सुरु असताना वर्दीतील पोलिसांनी एकमेकांवर लाठ्याकाठ्यासह हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली. मात्र सदर घटनेला दाबण्याचा पुरेपुर प्रयत्न पोलीस अधिकाऱ्यांनी केला असल्याचे समजते.
प्राप्तमाहिनुसार, ठाणेदार श्री ब्रम्हदेव शेळके यांचा कार्यकाळ गेल्या काही महिन्यांपासुन निरनिराळ्या चर्चेत दिसत आहे. काही महिन्यापुर्वी मालखेड पर्यटनस्थळावर दोन पोलीस कर्मचाऱ्यांना युवकांनी चांगलाच चोप दिला होता. याप्रकरणात मुख्य आरोपीला सोडुन दुसऱ्यालाच अटक केल्याची चर्चा त्यावेळी ती. यानंतर एका प्रकरणात शहरातील दोन पत्रकारांना अटक करून एकुन तीन पत्रकारांवर खोटे गुन्हेसुध्दा दाखल करण्यात आले होते. तसेच अनेक दिवसापासुन चोरींच्या घटनेत सुध्दा वाढ झाली असतांना पोलीस प्रशासन यावर अंकुश लावण्यात असमर्थ ठरले. यानंतर आता पोलीसांच्या कोजागिरीच्या कार्यक्रमात एका मद्यधुंद पोलिसाने धिंगाना घातल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. सगळीकडे कोजागीरी पौर्णीमा कार्यक्रमाचे आयोजन होत असतांना स्थानिक पोलीसांनी पुढाकार घेऊन पोलीस स्टेशनच्या आवारातच कोजागिरी करण्याचा निर्णय घेतला होता. पोलीसांनी पैसे गोळा करून कोजागिरीची संपुर्ण व्यवस्था केली होती. रात्री सर्व पोलीस एकत्रित आले आणि कोजागिरीचे दुध घोटण्याचा कार्यक्रम सुरू झाला होता. यावेळी ठाण्यातील कर्मचारी निलेश खंडार मद्यधुंद अवस्थेत या ठिकाणी आला. व आपसी घेणे-देण्याच्या वादातुन एएसआय दामोधर डोंगरे यांच्यासोबत हुज्जतबाजी केली. ही गोष्ट एवढी वाढली की दोघेही एकामेकावर तुटुन पडले व लाठ्याकाठ्याही काढल्या होत्या. तेथे उपस्थित कर्मचारीयांनी त्याना समजविण्याचा प्रयत्न केला मात्र दोघे काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यानंतर रागाच्या भरात दोघांनीही एकमेकावर लाठीने हल्ला केल्याची माहिती सुत्राकडुन मिळाली आहे.
घटनेचे गांभिर्य पाहता एएसआय दामोधर डोंगरे यांनी त्याचवेळेच सदर घटनेची नोंद स्टेशन डायरीमध्ये केली. त्यामध्ये स्पष्ट नमुद केले की, निलेश खंडार हा मद्यधुंद अवस्थेत आला होता व त्याने येथे हुज्जतबाजी केली. स्टेशन डायरीमध्ये झालेल्या नोंदमुळे सदर प्रकरण पुढे आले आहे. सदर घटना ही वसुलीवरून झाल्याची चर्चा शहरात सुरू होती. घटनेच्या दुसऱ्या दिवशी माहिती झाले असतांनासुध्दा ठाणेदार श्री शेळकेंनी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. यामुळे शहरात अनेक चर्चांना उधान आले आहे. काही लोकांचे म्हणने आहे की, ठाणेदार ब्रम्हानंद शेळकेंचे कर्मचाऱ्यांवर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नाही. त्यामुळे अशा घटना घडत आहेत. सदर प्रकरणाबाबत ठानेदार श्री शेळकेंनी सांगितले की, याबाबत चौकशी सुरू असुन संपुर्ण अहवाल वरिष्टकडे पाठविला जाईल.