नवी देहली – उजव्या विचारसरणीच्या लोकांनी बळाचा वापर करायला प्रारंभ केला आहे. हे लोक हिंसाचारात सहभागी असून हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्ये आतंकवाद घुसला आहे, असा आरोप अभिनेते कमल हसन यांनी तमिळ भाषेतील ‘आनंदा विकटन’ या साप्ताहिकात लिहिलेल्या लेखातून केला आहे. कमल हसन तमिळनाडू राज्यातील राजकारणात राजकीय पक्ष स्थापन करून सहभागी होणार आहेत. त्यामुळेच ते अशा प्रकारचे विधान करत आहेत, असे म्हटले जात आहे.
यात हसन यांनी पुढे लिहिले आहे की,
१. हिंदु आतंकवाद अस्तित्वात नाही, असे कोणीच म्हणणार नाही. यापूर्वी हिंदुत्वनिष्ठ चर्चा करण्यावर विश्वास ठेवायचे; पण आता ते हिंसाचारातही सहभागी होऊ लागले आहेत.
२. जनतेचा ‘सत्यमेव जयते’वरील विश्वास उडाला आहे.
३. तमिळनाडूच्या तुलनेत केरळ सरकारने धार्मिक हिंसाचार चांगल्या पद्धतीने हाताळला आहे, असे सांगत त्यांनी केरळ सरकारचे कौतुकही केले आहे.