*मेळघाटातील शेतक-यांच्या समस्येबाबत मनसेचे अल्टीमेटम*

0
609
Google search engine
Google search engine

अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /—



मेळघाट सारख्या अतीदुर्गम आदिवासी भागातील शेतक-यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी अनेक तक्रारी करूनही कार्यवाही झाली नसल्याने मनसेने अखेर अल्टीमेटम देऊन तिव्र आंदोलनाचा इशारा दिला.
      मेळघाट मधिल शेतक-याच्या अनेक वर्षापासुनच्या रखडलेल्या समस्या, तालुका कुषी कार्यालयात वाढलेला भ्रष्टाचार, अश्या अनेक शेतक-यांच्या समस्येवर त्वरित कार्यवाही व्हावी व होत असलेल्या शेतक-यांवरील अन्यायावर  निर्बंध लावण्यात यावे याकरिता मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रितेश अवघड यांच्या नेतृत्वात आज उपविभागिय कुषी अधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे अल्टीमेटम देण्यात आले. त्वरित या समस्या दूर न झाल्यास मनसे तिव्र आंदोलन करून शेतक-यांना न्याय मिळवून देईल असा इशारा सुध्दा देण्यात आला आहे. निवेदन देतांना प्रीतॆश अवघड उप जिल्हा अध्यक्ष,वीवॆक महल्लॆ,दिनेश पवार,पंकज पवतकर,सागर डांगॆ ,अंकुश पाटील व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.