भारत आणि रोमानिआ देशांत अत्यंत मधुर संबंध आहेत. रोमानिआच्या अकरावीच्या अभ्यासक्रमात जगात सर्वश्रेष्ठ असे रामायण आणि महाभारतातील काही भागांचा समावेश करण्यात आल्याची माहिती रोमानिआचे राजदूत राडू ओक्टावियन डोबरे यांनी याची माहिती दिली.www.vidarbha24news.com
दोन्ही देशांदरम्यान अत्यंत निकटचे सांस्कृतिक संबंध आहेत, असे राजदूत डोबरे यांनी सांगितले. भारतीयांशी आमचे खूप जवळचे संबंध आहेत. आम्ही अकरावीच्या अभ्यासक्रमात रामायण आणि महाभारतातील काही महत्वाच्या भागांचा समावेश केला आहे. आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक खंडात मुलांना याचे धडे दिले जातात, असेही त्यांनी सांगितले.