उद्योगपतींनी राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाकरता कार्य करणार्‍या संघटनांना दान करावे ! – नागेश गाडे, केंद्रीय समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

0
728
Google search engine
Google search engine

रामनाथी (गोवा)– हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सत्त्वगुणी उद्योगपती आणि व्यावसायिक यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. उद्योगपतींनी भावनेपोटी कोणाला साहाय्य न करता सत्पात्रे दान करावे. संत, तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाकरता कार्य करणार्‍या संस्था किंवा संघटना यांच्या कार्यासाठी दान करणे, हा धर्मकार्यातील सहभागच असतो, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे केंद्रीय समन्वयक श्री. नागेश गाडे यांनी केले. येथील सनातनच्या आश्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘उद्योगपती साधना शिबिरा’ला २५ नोव्हेंबरला आरंभ झाला. २७ नोव्हेंबरपर्यंत हे शिबीर चालणार आहे. शिबिराच्या उद्घाटनांनंतर बोलतांना श्री. गाडे पुढे म्हणाले, ‘‘धर्मकार्यात अन्य उद्योगपतींना या कार्यात जोडणे, त्यांचे संघटन करणे, हिंदुद्वेष्ट्यांकडून आक्रमण झालेल्या हिंदूंना साहाय्य करणे, पुढे येणार्‍या आपत्काळात हिंदुत्वनिष्ठांना अन्न, वस्त्र आणि निवास यांची व्यवस्था करून देणे, अशा प्रकारे योगदान दिल्याने उद्योगपतींची समष्टी साधनाच होणार आहे.’’

सनातनचे पू. पृथ्वीराज हजारे, ६२ आध्यात्मिक पातळी गाठलेले सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस आणि ६९ आध्यात्मिक पातळी गाठलेले सनातन संस्थेचे बंगाल आणि झारखंड राज्य धर्मप्रसारक तथा उद्योगपती श्री. प्रदीप खेमका यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन झाले. शिबिराच्या आरंभी सनातन साधक-पुरोहित पाठशाळेतील पुरोहित श्री. अमर जोशी यांनी शंखनाद केला अन् वेदमूर्ती सिद्धेश करंदीकर आणि श्री. अमर जोशी यांनी वेदमंत्रपठण केले. त्यानंतर सनातनचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांनी सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याची ओळख करून दिली. या वेळी समितीचे श्री. मनोज खाडये यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची माहिती उपस्थितांना करून दिली.