नवी देहली –
जर पद्मावती चित्रपटावर बंदी घालण्याच्या संदर्भात केंद्रातील मोदी सरकारने लवकरात लवकर हस्तक्षेप केला नाही, तर विश्व हिंदु परिषद देशातील सर्व चित्रपटगृहे जाळून टाकील; मग कोण आणि कुठे चित्रपट पहातील?, अशी चेतावणी विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष
डॉ. प्रवीण तोगडिया यांनी दिली आहे. हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नाही, तर हिंदु धर्माशी संबंधित श्रद्धेचा प्रश्न आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.