वर्धा :
”कपाशीच्या पिकावर यावर्षी बोंडअळीचे संकट कोसळले असून लागवडीचा खर्चही निघणार नसल्याने नाईलाजाने पिकावर नांगर फिरवावा लागणार आहे. आता तुम्हीच माझ्या पिकावरुन नांगर फिरवा,” असे पवनार येथील शेतकऱ्याने सांगताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या डोळ्यात पाणी तरळले. या शेतकऱ्यांची व्यथा सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी ट्रॅक्टरवर बसून या शेतकऱ्याच्या शेतावर प्रतिकात्मक नांगर फिरवला.