नवी देहली – केंद्र सरकारने अद्याप भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांना हुतात्मा असा दर्जा दिलेला नाही, अशी माहिती माहितीच्या अधिकारांंतर्गत मिळाली आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ हिस्टोरिकल रिसर्चमध्ये (आयसीएच्आर्मध्ये) यासंदर्भात अर्ज करण्यात आला होता. आयसीएच्आर्च्या वतीने छापण्यात आलेल्या एका पुस्तकात भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांचा कट्टरतावादी आणि आतंकवादी म्हणून उल्लेख आहे. आयसीएच्आर् हा विभाग मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत आहे. मागील सरकारनेही या हुतात्म्यांकडे दुर्लक्ष केल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले होते. जम्मूमधील रोहित चौधरी यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत यासंदर्भात प्रश्न विचारला होता.
Home ताज्या घडामोडी भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव हुतात्मा नाहीत ! – केंद्र सरकारचे माहितीच्या अधिकारात...