पंढरपूर :- उंबरे वेळापूर ( ता. माळशिरस)
येथील अनुसे वस्ती (चंडकाई वाडी) येथे राहणाऱ्या सुभाष शामराव अनुसे, त्याची पत्नी व दोन मुलींचे मृतदेह पिलीव ( ता. माळशिरस) घाटात आढळून आले आहेत. अनुसे कुटंबातील ४ जणांचा हा मृत्यू आत्महत्या आहे की, घातपात याविषयी उलटसुलट चर्चा सुरू असून या घटनेने माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सुलेवाडी हद्दीत असलेल्या या घाटात सुभाष अनुसे (वय ३५) त्याच्या दोन मुली ऋतुजा (वय १०), कविता (वय ७) हे तिघे फासावर लटकलेल्या अवस्थेत तर पत्नी स्वातीचा मृतदेह दगडाने ठेचून मारलेल्या अवस्थेत आढळून आला. प्राथमिक अंदाजानुसार सुभाष अनुसे यांनी पत्नीचा खून करून दोन्ही मुलींना फासावर लटकवून आत्महत्या केली असावी असे बोलले जात आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस घटनास्थळी तैनात असून अधिक तपास करत आहेत.