–दयालसिंग चव्हाण / संग्रामपुर ,बुलडाणा
ओबीसी,एस.सी.,एस.टी.,व्हिजेएनटी,एसबीसी व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची प्रलंबीत शिष्यवृत्ती तात्काळ जमा करावी अशी मागणी आज दिनांक 28 डिसेंबर रोजी संग्रामपुर तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने संग्रामपुर तहसिलदारमार्फत मुख्यमंत्रयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात नमुद की, शैक्षणिक सत्र सन 2015-16, 2016-17,2017-18 या वर्षाची शिष्यवृत्ती मिळालेली नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे . त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तात्काळ शिष्यवृत्ती जमा करण्यात बाबत डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जयंती दिनी संपुर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात आले होते. या मागण्या मान्य़ झाल्यास दिनांक 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनी महाराष्ट्रात सर्वत्र भिक मांगो आंदोलन करणार असल्याचे इशारा या निवेदनात देण्यात आले आहे . यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रवक्ता अभयसिंह मारोडे, आशिष बकाल, सतिष वानखडे,गोपाल मारोडे ,गजानन तायडे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.