नवी देहली – सीमारेषेवर केवळ पाकिस्तानकडूनच शस्त्रसंधीचे उल्लंघन होते, असे नाही. भारताकडूनही अनेकदा गोळीबार केला जातो, असे देशद्रोही वक्तव्य जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी केले. ते पुढे म्हणाले, ‘‘सीमेवरील गोळीबारामुळे अनेक लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. यामुळे भविष्यात युद्ध भडकण्याची शक्यता आहे. तथापि युद्धामुळे नव्हे, तर केवळ चर्चेनेच समस्या सुटू शकतात.’’ नोव्हेंबर २०१७ मध्येही अब्दुल्ला यांनी ‘पाकव्याप्त काश्मीर हा पाकिस्तानचा भाग असून तो पाकपासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही’, असे देशद्रोही विधान केले होते.