अचलपुर तालुक्यात अवकाळी पाऊसासह गारपीट – अवकाळी पावसाने संत्रा,गहू,हरभरा,कांदा पिकाचे नुकसान

0
913
Google search engine
Google search engine

अवकाळी पावसाने संत्रा,गहू,हरभरा,कांदा  पिकाचे नुकसान

अचलपूर:- अचलपुर तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीटीने संत्रा,गहु,हरभरा ,कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत  सापडला आहे यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यानी केली आहे.
     आज झालेल्या अवकाळी पावसासह गारपीटीने शिंदी,पोही,कुष्टा बु,काकडा,भिलोना तुळजापूर सह 90गावांतील  पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यात संत्राचे चांगल्या प्रमाणात आलेला बहार पूर्ण खाली आला तर शेतात सोंगुन पडलेला हरभरा पावसात सापडला आणि गहु पिकांचे ही नुकसान झाले आहे यामुळे या झालेल्या नुकसानीची प्रशासनाने पाहनी करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरीवर्गाने केले आहे. या सुलतानी संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिशय तत्परतेने तहसीलदार निर्भय जैन यांनी त्वरित मंडळ अधिकारी  व तलाठी कडून प्राथमिक अहवाल घेत जिल्हाधिकारी यांना सादर केला.तसेच शेतक-यां शक्य तेवढया लवकर शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.