बेंगळुरू –
पाश्चात्त्य कुप्रथेचे अनुकरण करून भारतीय संस्कृतीचा र्हास करणार्या करणार्या ‘व्हॅलेंटाईन डे’वर सरकारने सरकारने बंदी घालावी, अशी मागणी येथे हिंदु जनजागृती समिती आणि तिची रणरागिणी शाखा यांनी केली.
याविषयीचे निवेदन त्यांनी बेंगळुरूचे पोलीस आयुक्त्त टी. सुनील कुमार यांना दिले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. मोहन गौडा, सामाजिक कार्यकर्त्या सौ. अनुपमा रेड्डी आणि रणरागिणी शाखेच्या कु. भव्या गौडा उपस्थित होते.
या प्रसंगी ८ वृत्तवाहिन्यांनी समिती आणि रणरागिणी शाखा यांची या मागणीला अनुसरून मुलाखत घेतली.