त्या दोन आरोपींना ८ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी – चांदूरर रेल्वे येथील बहुचर्चीत हत्या प्रकरण

0
624
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वेः – शहेजाद खान –
 पैशाच्या वादावरून शिरजगाव ता. मोर्शी व अमरावती येथील दोन युवकांना १४ मार्च रोजी चांदूर रेल्वेत झालेल्या गंभीर मारहाणीत एकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात चांदूर रेल्वे पोलीसांनी सर्वप्रथम अटक केलेल्या दोन आरोपींना सोमवार (ता. २६) ला पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना एमसीआर दिला असुन त्यांची जेलमध्ये रवानगी करण्यात आली.
      मोर्शी तालुक्यातील शिरजगाव येथील पंडित विक्रम पाटणकर (४५) व अमरावती येथील लक्ष्मीनगरमध्ये राहणारे गौरव सुरेश तिडके (२७) या दोघांना आरोपी शुभम सिताराम दुबे व त्याच्या साथिदारांनी १४ मार्चला फोन करून चांदूर रेल्वेतील लिटील स्टार स्कुलच्या ग्राऊंडवर बोलाविले. १५ हजार रूपयाच्या वादावरून आरोपी व त्याच्या साथीदारांनी दोघांनाही बेदम मारहाण केली. या मारहाणीत उपचारा दरम्यान पंडित पाटणकर यांचा मृत्यु झाला. या प्रकरणी चांदूर रेल्वे पोलीसांनी सर्वप्रथम २० मार्चच्या रात्री उशिरा आरोपी विजय तिवारी (वय ३०) रा. अकोला व विजय उपाध्याय (वय ४०) रा.चांदूर रेल्वे यांना अटक केली होती. या दोन आरोपींना अटक केल्यानंतर त्यांना २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली  होती. त्यानंतर २६ मार्ज रोजी पुन्हा त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना ८ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असुन त्यांची जेलमध्ये रवानगी झाली आहे.
     सद्यास अटक आरोपींची एकुण संख्या ६ झाली आहे. शुभम सिताराम दुबे (२४) सह पवन सुरेशसिंह ठाकुर ( ३२), चेतन शंकर रॉय(२७), राजा विष्णुपंत राऊत (२४) रा.चांदूर रेल्वे यांना शनिवारी रात्री ९ वाजता अटक केली. चौघांना उद्या २८ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर सागर गाढवेसह इतर आरोपी अजुनही फरार आहे. या प्रकरणाचा तपास पीएसआय भारत लसंते करीत आहे.