अ.भा. हिंदु महासभेने पंतप्रधानांना रक्ताने लिहिले पत्र
नवी देहली – अनुसूचित जाती आणि जमाती अधिनियमात (अॅट्रॉसिटीमध्ये) पालट करण्याचा आदेश नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे; मात्र त्याला केंद्र सरकारने आव्हान देत न्यायालयात पुनर्विचार याचिका प्रविष्ट केली आहे. ही याचिका परत घ्यावी, अशी मागणी करणारे रक्ताने लिहिलेले पत्र अ.भा. हिंदु महासभेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे. या संदर्भात अलीगड येथे निदर्शने करण्यात आली. जर सरकारने याचिका मागे घेतली नाही, तर देहलीत रामलीला मैदानामध्ये मुंडन करून आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी देण्यात आली आहे.