चांदूर रेल्वेः – (शहेजाद खान )
पैशाच्या वादावरून १४ मार्च रोजी चांदूर रेल्वेत झालेल्या गंभीर मारहाणीत एकाचा मृत्यू झाला होता. शहरातील या बहुचर्चित हत्या प्रकरणातील नऊ आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ४ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. सदर प्रकरणातील २ आरोपी अजुनही फरार आहे.
मोर्शी तालुक्यातील शिरजगाव येथील पंडित विक्रम पाटणकर (४५) व अमरावती येथील लक्ष्मीनगरमध्ये राहणारे गौरव सुरेश तिडके (२७) या दोघांना आरोपींनी १४ मार्च रोजी चांदूर रेल्वेत बेदम मारहाण केली होती. १५ हजार रूपयावरून झालेल्या या वादात उपचारादरम्यान पंडित पाटणकर यांचा नागपुर येथील रूग्णालयात मृत्यु झाला होता. या प्रकरणात एकुण ९ आरोपींना टप्प्या टप्प्याने अटक केले आहे. शुक्रवारी २० एप्रिलला न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर शुभम सिताराम दुबे (२४), पवन सुरेशसिंह ठाकुर ( ३२), चेतन भांकरलाल रॉय(२७), राजा विष्णुपंत राऊत (२४), विजय उपाध्याय (वय ४०), सागर पांडुरंग गाढवे (३०), मनिष रतनलाल उपाध्याय (३०) रा.चांदूर रेल्वे, विजय तिवारी (वय ३०) रा. अकोला व राहुल तांडेकर रा. चांदूरवाडी यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांच्या न्यायालयीन कोठडीत ४ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणातील वैभव पांडे रा. चांदूर रेल्वे व रितेश बनारसे रा. अमरावती हे दोन आरोपी फरार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय भारत लसंते करीत आहे.