श्रीनगर – काश्मीरमधील पंचायत राज समितीच्या कामकाजाचा अभ्यास करण्यासाठी गेलेले महाराष्ट्रातील आमदार विक्रम काळे, तुकाराम काते, सुरेश अप्पा पाटील, सुधीर चव्हाण आणि सुधीर पारवे या ५ आमदारांच्या वाहनावर अनंतनाग येथे आतंकवाद्यांनी आक्रमण केले; मात्र यात सर्व आमदार बचावले. आतंकवाद्यांनी त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर गोळीबार केला आणि ग्रेनेड फेकला होता. यात गाड्यांचे टायर फुटले, तर एका गाडीच्या काचा फुटल्या. ही घटना २३ मे या दिवशी दुपारी घडली. त्यानंतर त्यांना अधिक सुरक्षा देण्यात आली आहे.