अयोध्येमध्ये प्रभु श्रीरामाचे पूजन करणे, हे संविधानिक असून ते घटनेने मान्य केले आहे. त्यामुळे राममंदिर बनवणे, हे राष्ट्राचे कर्तव्य आहे. राममंदिर निर्माण करण्याला विरोध म्हणजे राष्ट्राला विरोध करण्यासारखे आहे. राममंदिर उभारण्यासाठी देशात जनभावना जागृत होणे आवश्यक आहे. राममंदिर निर्माण होत असतांनाच हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर होतील आणि दोन्हींची स्थापना लवकरच होईल, असे प्रतिपादन अधिवक्ता हरि शंकर जैन यांनी केले.
अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी सायंकाळच्या सत्रात हिंदु समाजाच्या रक्षणाचे आव्हान, विद्यमान लोकशाहीत फोफावलेल्या दुष्प्रवृत्ती रोखण्यासाठी करावयाचे प्रयत्न आदी विविध विषयांवर उपस्थित मान्यवरांनी हिंदुत्वनिष्ठांचे उद्बोधन केले.