वेरुळ धर्मपीठाचे उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरीजी महाराज यांना धमकीचे पत्र

0
2124
Google search engine
Google search engine

शांताराम मगर – प्रतिनिधी वैजापुर :-

निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी ( मौनगिरीजी ) महाराज धर्मपीठाचे उत्तराधिकारी समाजरत्न श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांना शुक्रवारी एक धमकीचे पत्र आले असून या पत्रात ” शांतिगिरी आपल्याला ढ़गात पाठवण्याची किंवा आसाराम बापू करण्याची तयारी झाली आहे बघतोच आता ” असा मजकूर लिहिन्यात आला असून हे पत्र नितिन गणेश मोरे या व्यक्तिने फक्त नाशिक असा स्वताचा पत्ता लिहून पाठविली आहे.

तर या संदर्भात खुलताबाद पोलिस स्टेशनला संबधित व्यक्तिवर भा द वी 507 नुसार धर्मपीठाद्वारे गणपत म्हस्के यांनी गुन्हा दाखल केला असून हा गुन्हा खुलताबाद पोलिस निरीक्षक हरीश खेडकर यांनी दाखल करून घेतला आहे तर यावेळी सचिव रामानंदजी महाराज , प्रशासकीय अधिकारी के बी भामरे , राजेन्द्र पवार , सतीश फुलारे , राजेन्द्र चव्हाण , मनोहर गावड़े , सागर मातकर , शेकनाथ दादा होळकर , जनार्दन आधाने , केशव आबा होळकर , परसराम बारगळ , संदीप नरोटे , जगन्नाथ उगले , गणेश बोडके , साहेबराव लाळे , बाळासाहेब गवली , अप्पाराव नागे , कारभारी पगार , जगन्नाथ उगले , भगवान भोजने , राजेंद्र देव , गणेश कुभांडे , नानासाहेब जाधव , भरत पवार , पुंडलिक दादा बारगळ , भिकन आल्हाड , सागर शिंदे , अरविंद पवार , मयूर चव्हाण , सुदाम परदेशी , रामेश्वर लाळे , अमोल गोरे , हरिभाऊ सोनवणे , संतोष जाधव , महेश होळकर यांच्यासह धर्मयोद्धा संघ पदाधिकारी व भक्तपरिवाराची मोठी उपस्थिती होती.