परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
परळी तालुक्यातील मौजे बेलंबा येथे वै.प्रा.हरिश्चंद्र पंडितराव गित्ते यांच्या पुण्यस्मरणा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह श्री शिवलीलामृत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आज दि.10.आँगस्ट रोजी रात्री 9 ते 11 दरम्यान भागवताचार्य ह.भ.प.श्री तुकाराम महाराज शास्त्री मुंडे टोकवाडीकर यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे. या सुश्राव्य कीर्तन कार्यक्रमास ग्रामस्थ व परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.तालुक्यातील मौजे बेलंबा येथे गेल्या 7 वर्षापासून हरिसुख प्रतिष्ठाणच्या वतीने वै.प्रा.हरिश्चंद्र पंडितराव गित्ते यांच्या पुण्यस्मरणा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह श्री शिवलीलामृत कथेचे आयोजन करण्यात येत असून या दरम्यान दि.6 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट या दरम्यान ह.भ.प.श्री. प्रभाकर महाराज झोलकर यांच्या मधुरवाणीतून शिवलिला अमृतकथेचे सुरुवात झाली आहे. आजची पाचव्या दिवशीची सेवा आज दि.10 आँगस्ट रोजी होणार्या भागवताचार्य ह.भ.प.श्री तुकाराम महाराज शास्त्री मुंडे टोकवाडीकर हे पाचव्या दिवशीची कीर्तन सेवा सादर करणार आहेत. या सुश्राव्य कीर्तन कार्यक्रमास ग्रामस्थ व परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने
उपस्थित रहावे असे आवाहन हरिसुख प्रतिष्ठाणचे अध्यक्ष राजेश गित्ते, धनंजय गित्ते, अजय गित्ते, बलभिम गित्ते आदींनी केले आहे