उस्मानाबाद – प्रा. राजा जगताप हे उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी( बेंबळी) या गावचे रहिवाशी आहेत ते प्राध्यापक आहेत त्यांनी हि कवीता वास्तव परस्थीतीवर केली आहे ती कवीता सध्या सोशल मिडियावर चांगलीच गाजली आहे
कविता
—————————————
घन दाटूनं आला
वारा सुसाट सुटला
नभ मातित कोसळला
हिरवा सागर फेसाळला
गंध मातीला आला
दवं मोत्याचा झाला
गंध फुलांना सुटला
शिवार पिकांनं माखला
सपन डोळ्यात सजलं
मन बहरून आलं
चिज घामाचं झालं
सुख डोळ्यात दाटलं
सावकार खळ्यात आला
रास घेऊनं गेला
बाप मातरं भरायला
मायींनं हंबरडा फोडला
दान नभानं दिलं
पण माणसांनं हिसकावलं …!
प्रा.राजा जगताप
उस्मानाबाद
🙏🏻🙏🏻🌷🌷💐💐💐💐