भारत बंदला उस्मानाबादच्या भीम आर्मी संघटनेचा पाठिंबा

0
1049
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद – भाजप सरकारच्या कालात पेट्रोल, डिझेल, गँस दरवाढीच्या विरोधात पुकारलेल्या भारत बंदला ” भीम आर्मी ” चा जाहिर पाठिंबा……डॉ. रमेश बनसोडे* सरकारी नोकरबंदीच्या कालात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मध्यमवर्ग आणि गरीब युवक-युवतींना बँका कर्ज देत नाहीत एवढेच नाहीतर शेतकर्यांना सुद्धा शासकिय अनुदान मिलण्याच्या आशेवरच रहावे लागते. नोटाबंदीचा जनतेला बसलेला फटका, शासकीय कार्यालयांमध्ये वाढत चाललेला भ्रष्टाचार, यातच जनता होरपलुन जात असताना रोजच्या जीवनात वापरात येणार्या गरजेच्या वस्तु पेट्रोल, डिझेल, गँस यांच्या किंमती दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रत या पेट्रोलियम वस्तु २० ते ५० रुपयांनी महाग आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करुन आणि याला कुठेतरी आला बसण्यासाठी काँग्रेस आय पक्षाने पुकारलेल्या भारत बंदला “भिम आर्मी” उस्मानाबाद च्या वतिने जाहीर पाठिंबा डॉ. रमेश बनसोडे, जिल्हाध्यक्ष- यांनी दिल्याचे जाहीर केले आहे