उस्मानाबाद – मनसेच्या जिल्हाअध्यक्षा वैशाली गायकवाड यांचा पारा चढला, कळंब शहरातील सर्व बससेवा केल्या बंद

0
1872
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद- जिल्ह्यातील कळंब शहरांमध्ये मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांचा पारा चढलेला दिसला पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ मनसेच्या महिला आघाडिच्या जिल्हा आध्यक्षा खळखट्याक फेम वैशालीताई गायकवाड यांनी मनसेच्या पदाधीकारी यांना सोबत घेऊन मनसेच्या वतीने भारत बंदला प्रतीसाद देत कळंब शहरातील सर्व बसेस बंद करण्यात आल्या होत्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या भारत बंदला प्रतिसाद दिल्याचे दिसले उस्मानाबाद मनसेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वैशाली गायकवाड यांनी त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन राज ठाकरे यांच्या आदेशाने कळंब शहरांमधील सर्व बसेस बंद ठेवण्यात आले आहे आज सकाळी मनसेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वैशाली गायकवाड यांनी कळंब शहरातील बस स्थानकात जाऊन त्या ठिकाणच्या डेपो मॅनेजर व बस स्थानक प्रमुखाशी संपर्क साधून त्यांना संपूर्ण कळंब तालुक्यातील बस सेवा बंद करण्याचे करण्याच्या सूचना दिल्या आहेत दरम्यान कळंब आगार प्रमुख व तहसीलदारांना निवेनही देण्यात आले आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना घेऊन कळंब बस स्थानकाचे गेट बंद करून सर्व बसेस थांबवण्यात आल्या होत्या हे आंदोलन उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब शहरांमध्ये करण्यात आले आहे त्यामुळे उस्मानाबाद शहरांमध्ये मनसेचे कार्यकर्ते दिसत नव्हते परंतु कळम शहरांमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला चे दिसत आहे या आंदोलनामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पवन वर्पे दत्ता घोगरे दया कांबळे यांच्यासह कळम शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते