पुढच्या ऊस गाळप हंगामात अतिरिक्त साखरेची समस्या दूर करण्यासाठी केंद्र सरकारच्या हालचाली सुरु
सूत्रांच्या माहितीनुसार…
साखर कारखान्यांना प्रतिटन 140 रुपये देण्याचा प्रस्ताव, सागर किनारी भागात दोन हजार पाचशे रुपये, तर अंतर्गत भागात तीन हजार रुपये वाहतूक अनुदान, विक्रमी उत्पादनामुळे घसरलेल्या दरांवर उतारा म्हणून केंद्र सरकारची पावलं उचलण्याची हालचाल सुरु.
अन्न मंत्रालयाने हा प्रस्ताव तयार केला असून पुढच्या आठवड्यातल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मान्यता मिळण्याची शक्यता.