सेंद्रीय शेती काळाची गरज

0
4929

नाशिक (प्रतिनिधी)

रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस
कमी होऊ लागला. शेती उत्पन्नात घट आणि शेती उत्पादन खर्च वाढू लागला. आधुनिक बियाण्यांमुळे पारंपरिक बियाण्यांच्या जातीनष्ट होऊ लागल्या. शेतक-यांनी स्वत:च्या तसेच राष्ट्राच्या हिताचा विचार करून सेंद्रीय शेती पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आणि सर्वाच्याच फायद्याचे आहे.वरुणराजाच्या आगमनामुळे शेतकरी शेतीच्या लागवडीमध्ये गुंतले आहेत. स्वातंत्र्यानंतर आधुनिक पद्धतीने शेती उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न झाला, परंतु मागील दहा-पंधरा वर्षामध्ये देशात शेतक-यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत; ही शेतीप्रधान देशातील चिंताजनक बाब आहे. इतकेच नव्हे तर १ जून, २०१७ पासून शेतकरी बांधवांना संपाचे हत्यार उपसावे लागले. जवळ-जवळ सात दिवस हा संपचालू होता. देशात पहिला शेतक-यांचा संप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ‘खोती पद्धती’ नष्ट करण्यासाठी १९२८ साली रायगड जिल्ह्यातील ‘चरी’ या गावी करण्यात आला होतो. हा संप सात वर्षे चालला. त्यामुळे ‘कूळ कायदा’ अस्तित्वात आला. मात्र, २०१७ च्या संपामुळे महाराष्ट्र शासनाने शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी तत्त्वत: मान्यता दिली असली तरी या कर्जमाफीचा फायदा किती शेतक-यांना होणार आहे हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. परंतु जमिनीची कमीत-कमी होत जाणारी सुपीकता लक्षात घेऊन आज शेतक-यांनी सेंद्रीय शेतीचा अवलंब करणे आवश्यक आहे.शेतक-यांना दुष्काळास तोंड द्यावे लागत असल्यामुळे त्यांना धीर देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध उपाय सुचविले होते. त्यापैकी ‘पीक विमा योजना’ होय. शेतजमिनीचे विभाजन म्हणजे, शेती व्यवसायाच्या अधोगतीचे कारण आहे. त्यासाठी शेतीक्षेत्रातील पीक उद्योगधंद्यात वळवले पाहिजे. त्यामुळे शेती व्यवसायातील दरडोई उत्तम वाढेल. शेतीचा विकास करण्यासाठी राज्यसमाजवादाचा सिद्धांत मांडला. या सिद्धांतामध्ये गावातील शेती सर्व शेतक-यांनी मिळून पिकवावी. तिच्यासाठी भांडवली खर्च राज्य सरकारने करावा आणि शेतीतला माल निघाल्यावर त्याची वाटणी करारातील अटीनुसार शेतकरी व सरकारमध्ये व्हावी. परंतु त्या वेळच्या शासनाने राज्य समाजवादाच्या सिद्धांताकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आज एक लाखापर्यंत कर्ज माफ करून, शासकीय कर्मचा-यांचे एका दिवसाचे वेतन शेतक-यांना देण्याचे आवाहन करण्याची वेळ राज्य शासनावर आली. जर त्यावेळच्या शासनाने राज्य समाजवादाचा सिद्धांत पाळला असता तर आज शेतक-यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती.भारतीय शेती ही भारतीय लोकांच्या उपजीविकेचेप्रमुख साधन असल्यामुळे शेती हा भारताचा आत्मा आहे, असे महात्मा गांधींनी सांगितले होते. सध्या शेतीक्षेत्रावरील वाढता भार, रासायनिक खतांचा अतिरेकी वापर आणि कमी होत जाणारी शेतीची उत्पादकता यामुळे शेत जमिनीचाकस कमी होऊ लागला आहे. त्यासाठी एकमेव उपाय म्हणजे ‘सेंद्रीय शेती’ पद्धतीचा अवलंब करणे होय.‘सेंद्रीय शेती’ पद्धतीचा विचार केला तर ‘सेंद्रीय शेती’ ही मूलभूत गरजांवर आधारित आहे. त्यासाठी सेंद्रीय शेती पद्धत शेतीप्रधान देशातील प्रत्येक शेतक-याने समजून घेऊन तिची अंमलबजावणी केली पाहिजे.नवीन बी-बियाणे आणि रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ होऊन देशात १९६६ नंतर हरित क्रांतीचे वारे जोराने वाहू लागले. तरी, त्यामध्ये सातत्य टिकविता आले नाही याचा परिणाम शेतकरी आत्महत्या करू लागले. आजही शेतक-यांच्या आत्महत्या शासनाला थांबवता आल्या नाहीत हे शासनाचे अपयश म्हणावे लागेल.शेतक-यांच्या संपामुळे दीड लाखाची कर्जमुक्ती मिळाली मात्र यातून खरे शेतकरी कर्जमुक्त होणार का, हा खरा प्रश्न आहे. याला कोकणातील शेतकरी अपवाद आहेत. कारण कोकणातील शेतकरी प्रामाणिक आहेत. त्यांच्यामध्ये समयसूचकता असते. म्हणून तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत नाही.सध्या शेती उत्पादनावरील दिवसेंदिवस खर्च वाढत आहे. जमिनीचा कस कमी होत चालला आहे. पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महागडे सावकारी कर्ज व बँकांकडून घेतलेले कर्ज, कमी उत्पादनामुळे कर्जाची परतफेड आणि घरखर्च चालविणे शेतक-यांना अशक्य झाले आहे. त्यात दलालदादांच्या चक्रवाढ व्याजामुळे शेतकरी आत्महत्या करू लागले.आज शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा अवलंब करण्याची गरज नाही. त्यापेक्षा शेतीची सेंद्रीय पद्धतीने कशी लागवड करता येईल याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. केवळ शेतीविषयी माहिती देण्याचे काम शेतीदूत करीतअसतील तर समाधान आहे. मात्र शेतक-यांबरोबर फोटो काढून वर्तमानपत्रांत प्रसिद्धी मिळविण्याचे काम न करता शासनाच्या विविध योजना शेतक-यांपर्यंत कशा पोहोचतील आणि त्याचा फायदा कसा शेतक-यांना घेता येईल, असे प्रत्यक्ष काम शेतीदूताने करणे गरजेचे आहे.आजही शेतक-यांसाठी स्वतंत्र कृषी विभागाची स्थापना केली गेली तरी शेतक-यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. फक्त मार्गदर्शन करून चालणार नाही तर त्यांचा उपभोग पण शेतक-यांना घेता आला पाहिजे. त्यासाठी शेतीचा विकास कसा होईल त्यासाठी एकमेव पारंपरिक पद्धत म्हणजे ‘सेंद्रीय शेती’ होय.शेतक-यांमध्ये शेतीविषयक ज्ञानाचा अभाव आणि असंघटितपणामुळे दिवसेंदिवस शेती व्यवसाय तोटय़ात चालला आहे. त्यामुळे शेतक-यांना खरी गरज आहे ‘सेंद्रीय शेती’ पद्धतीची.सेंद्रीय शेती पद्धतीनुसार पारंपरिक बी-बियाणे वापरणे, जमिनीची धूप थांबविणे त्यासाठी योग्य ठिकाणी बांध घालणे, मशागत करणे शेण-गोमूत्राचा जास्त वापर करणे यामुळे पाणी वाफ्यात टिकून राहते. बैल मशागतीने जमिनीची नांगरणी उत्तम होते. नांगरणी उत्तम झाल्यामुळे पिकांची वाढ चांगल्याप्रकारे होते. अशी शास्त्रोक्त पद्धतीने शेती केल्यास शेती उत्पादन वाढेल आणि खासगी सावकारांच्या दुप्पट व्याजाच्या चक्रातून शेतकरी मुक्त होईल. त्यामुळे सबसीडी देण्याची वेळ शासनावरती येणार नाही. त्यासाठी शासकीय योजना शेतक-यांपर्यंत पोहोचतात काय? त्याचा फायदा शेतक-यांना होतो काय, याचा पाठपुरावा झाला पाहिजे, तरच, शेतक-यांना सुगीचे दिवस येऊन त्यांच्या आत्महत्या रोखता येतील.

रासायनिक शेतीमुळे होणारी मातीचीहानी टाळण्यासाठी तसेच उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सेंद्रीय शेती हा उत्तम पर्याय आहे. दुष्काळी परिस्थिती, पाण्याची अनुपब्धता पाहता पारंपरिक सेंद्रीय शेती फायदेशीर ठरणारी असून यातून ग्रामीण भागातील स्वच्छतेची समस्याही मार्गी लागू शकते. सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषद सातत्याने प्रयत्न करीत असून जास्तीत जास्त शेतकर्यांनी या सेंद्रीय शेतीकडे वळावे तसेच अपांपरिक उर्जेचा वापर वाढविण्यावर भर द्यावा.
★सेंद्रिय शेतीचे फायदे:-
1)सेंद्रिय खतांचे प्रकारकृषिप्रधान देश म्हणून भारताला सर्व जगात ओळखले जाते. देशानी कृषी तंत्रज्ञान आणि संशोधनात चांगलीच प्रगती केली आहे. बऱ्याच राज्यात कृषीविद्यापीठे उभारून कृषी व्यवस्थापनाचा दर्जा व्यवसायाभिमुक करण्याचा प्रयत्न चालू आहे. यावरून भारताची कृषीक्षेत्रातील वाटचाल बऱ्याच प्रमाणात स्वालंबी होण्याच्या दिशेने होत आहे. आणि हा एक चांगला मापदंड आहे !असो. प्राचीन काळापासून जमिनीला मातेचे स्थान देण्यात आले आहे त्यामुळे आपण जमिनीला भूमाता असेसंबोधतो. ज्याप्रमाणे पशुपक्षी, प्राणी व वनस्पतीजिवंत आहे. त्याच प्रमाणे माती सुद्धा जिवंत आहे. त्यात असंख्य जीवजंतू वास्तव्य करून राहतात म्हणून आपण भूमाता सजीव आहे असे समजतो.मनुष्य दिवसेंदिवस स्वार्थी होत आहे. तो स्वत:च्या फायद्यासाठी शेतजमिनीकडे दुर्लक्ष करतो. मनुष्य ज्या प्रमाणे श्वासोच्छ्वास करतो त्याप्रमाणे माती सुद्धा श्वास घेते. मनुष्याला जसे उन, वारा, पाऊस, रोग यापासून संरक्षणाची गरज आहे तसे मातीचे सुद्धा संरक्षण होणे गरजेचे आहे. आपल्या पूर्वजांनी ही संपत्ती पुढील पिढीकडे जशी जिवंत सोपवली तशी आपणसुद्धा तिचा सांभाळ करून येणाऱ्या पिढीला ती जिवंत स्थितीतच सोपवली पाहिजे. यामुळे अमुल्य अश्या मातीच्या थरांचे आपोआप जतन आणि संवर्धन होऊन मातीचा पोत टिकून राहील.पूर्वी जमिनीवर झाडे-झुडपे व गवत यांचे आच्छादन असे, त्यामुळे वारा, पाऊस इत्यादिंपासून संरक्षण वसंवर्धन हे नैसर्गिकरीत्या होत होते. परंतु माणसाने आपल्या अन्न, पाणी आणि निवार्याच्या गरजा भागविण्यासाठी कालांतराने जमिनीवरील झाडे गवत इत्यादींना तोडण्यास सुरवात केल्याने त्याचा परिणाम जमिनीची धूप होण्यात झाला. जमिनीची धूप झाल्याने झाडांच्या मुळांचा आधार निघून गेला त्यांच्या वाढीस आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा नाश होऊ लागल्याने आणि झाडांना आवश्यक असलेला पाणी पुरवठाही अल्प होऊ लागल्याने त्याचा परिणाम जमिनीची सुपीकता कमी होण्यात झाला आणि त्याचा परिणाम म्हणून कृषीउत्पादकतेत घट होऊ लागली. एक इंच मातीचा थर निर्माण करण्यास निसर्गाला बरीच वर्ष लागतात. परंतु मानवाच्या स्वार्थी, हलगर्जी आणि निष्काळजीपणामुळे हा थर नाहीसा होण्याची शक्यता आहे. घुपेचे रौद्र रूप विचारात घेता मातीचे संरक्षण आणि संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे.सेंद्रिय शेती खालील महत्वपूर्ण मुद्यांवर अवलंबून आहे जसे.मातीचे संवर्धन, तपमानाचे व्यवस्थापन,*.पावसाच्या पाण्याचे नियोजन आणि संवर्धन, सौर उर्जेचा अधिकतम वापर व उपयोग,गरजांमध्ये स्वावलंबन,नैसर्गिक क्रमचक्र आणि जीवनाच्या स्वरूपांचे अनुपालन,जनावरांची एकीकृतता,नवीनीकरणीय संसाधनांवर अधिकतम अवलंबन, जसे पशु-बलसेंद्रीय होय.
★शेतीची मुख्य वैशिष्ट्ये
१) मातीचा सुपीकपणा कायम राखते.२) सेंद्रीय शेती ही एक स्थायी आणि पर्यावरणास अनुकूल अशी उत्पादन प्रक्रिया आहे, ज्यामध्ये लहान शेतकर्यांसाठी विशिष्ट लाभ आहेत. सेंद्रीय शेती खालील सुविधांच्या योगे अन्न-सुरक्षा आणि गरीबांच्या हाताला काम आणि दोन पैसे जास्त फायदा मिळवून देते. कमी संसाधने व पाऊसपाणी असलेल्या क्षेत्रांत उत्पादनाची वाढ होणे.शेत आणि आसपासच्या क्षेत्रात जैव विविधता आणि नैसर्गिक संसाधनांचे जतन होणे.मिळकत वाढवणे किंवा खर्च कमी करणे.

★सुरक्षित आणि विभिन्न खाद्यान्नांचे उत्पादन घेणे.

१) मातीचे संवर्धन – रसायनांचा वापर थांबविणे, ओल्या गवताच्या जागी पिकाचे अवशेष उपयोगात आणणे, सेंद्रीय आणि जैविक खताचा उपयोग करणे, पीक क्रमचक्र आणि बहु-पिकांचा अवलंब करणे, अत्यधिक नांगरणी करणे टाळा आणि मातीस हिरव्या किंवा ओल्यागवताखाली झाका.२) तपमानाचे व्यवस्थापन – माती झाकून ठेवा, बांधावर झाडे-झुडपे लावा.३) माती आणि पावसाच्या पाण्याचे संवर्धन – पाझर टाक्या खणा, उतार असलेल्या जमिनीवर समोच्च बांध घाला आणि समोच्च पंक्ति शेतीचा अवलंब करा, शेत-तलाव खणा, बांधांवर कमी उंचीचे वृक्षारोपण करा.४) सौर उर्जेचा वापर करणे – वर्ष भर विविध पिके आणि वृक्षारोपण कार्यक्रमाच्या संयोजनाच्या माध्यमाने अधिक हिरवाई मिळवा.५) स्वतःच्या गरजांमध्ये स्वावलंबन- स्वत:च बियाण्याचा विकास करा, कंपोस्ट, वर्मीकंपोस्ट, वर्मीवॉश, द्रव खते आणि वनस्पति अर्काचे उत्पादन.६) जैववैविध्याचे अनुपालन – जीववैविध्य टिकून राहावे म्हणून आवास विकास करा, कीटकनाशकांचा वापर कधीही करू नका, जैववैविध्य निर्माण करा.७) जनावरांची एकीकृतता – जनावरे ही सेंद्रीय व्यवस्थापनाचे महत्वपूर्ण घटक आहेत आणि हे फक्त पशु-उत्पादनेच पुरवित नाहीत तर मातीमध्ये वापर करण्यासाठी पुरेसे शेण आणि मूत्र प्रदान करतात.८) नवीनीकरणीय उर्जेचा वापर – सौर उर्जेचा, बायोगॅस आणि बैलांच्या द्वारे चालविण्यात येणारेपंप, जनरेटर आणि इतर यंत्रे ह्यांचा उपयोग करासेंद्रिय खतांचे प्रकारवनस्पती व प्राणी यांच्या अवशेषापासून जे खत तयारहोते त्याला सेंद्रिय खत म्हणतात.सेंद्रिय खतांमध्ये महत्त्वाची खते म्हण्जे शेणखत, कंपोस्ट, हिरवळीची खते, गांडूळ खते, माश्यांचे खत, खाटिक खाण्याचे खत, हाडांछे खत, तेलबियांची पेंड इत्यादी.

१) शेणखत : शेण, मुत्र, गोठ्यातील पालापाचोळा इत्यादी घटकापासून तयार होणा-या खताला शेणखत म्हणतात. त्यामध्ये नत्र, स्फूरद व पालाश असते. शेणाचा महत्त्वाचा उपयोग म्हण्जे बायोगँसमध्ये उर्जा निर्मितीसाठी होतो आणि शिल्लक राहिलेले पातळ शेण पिकांच्या वाढीसाठी पोषक अन्नद्रव य म्हणुन वापरले जाते.२) कंपोस्ट खत :- शेतातील गवत, पिकांचे कापणीनंतर उरलेले अवशेष, भुसा, उसाचे पाचट, कापसाची धसकटे इ. सेंद्रिय पदार्थाचे सुक्ष्मजीवजंतु मुळे विघटन होऊन त्यातील कार्बन नत्राचे प्रमाण कमी होते व चांगला कुजलेला पदार्थ तयार होतो त्याला कंपोस्ट म्हणतात. यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश असते.३) हिरवळीची खते :- लवकर वाढणा-या पीकांची निवड करून, त्यांची दाट पेरणी करुन पीक फुलो-यावर येण्याच्या आधी ते नागराच्या सहाय्याने जमिनीत गाडतात त्यापासून जमीनीला नत्र मिळते. जमिनीचा पोत सुधारतो व ती सुपीक बनते. अशा खतांना हिरवळीचेखत म्हणतात.गाडलेल्या पिकांना कुजण्य़ासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालवधी लागतो. ताग, धैच्या, मूग, चवळी, गवार, शेवरी, बरसीम, ग्लीरीसिडीया तागापासून नत्राचा पुरवठा ५ ते ६ आठवड्यात होतो.मुगाचा पालापाचोळा जमिनीत गाडल्यामुळे गव्हाच्या उत्पादनात चांगली वाढ होते.४) गांडूळ खत – ह्या खतात गांडूळाची विष्ठा, नैसर्गिकरित्या कुजलेले पदार्थ, गांडूळाची अंडीपूंज, बाल्यावस्था आणी अनेक उपयुक्त जीवाणूंचा समावेश असलेल्या खताला गांडूळ खत म्हणतात.५) माशाचे खत – समुद्रकिनारी वाया गेलेल्या माशांपासून तसेच माशाचे तेल काढल्यानंतर उरलेल्या अवशेषापासून जे खत तयार होते ज्यात नत्र,स्फुरद आणि पालाश यांचे प्रमाण भरपूर असते याला माशाचे खत म्हणूनही म्हंटले जाते. ६) खाटीकखान्याचे खत – खाटीकखान्यात जनावरांचे रक्त व अवशेषापासून जे खत बनवितात त्याला खाटीकखान्याचे खत म्हणतात यात नत्र आणि स्फुरद चांगल्या प्रमाणत असते.

शब्दांकन :- यामिनी लोहार
संकलन :- उत्तम गिते , नाशिक