दर्यापूर, अंजनगाव व परिसरातील गावांत तीन दिवस पाणीपुरवठा बंद

0
1787

अमरावती- :

शहानूर धरणावरील मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती होणार असल्याने दर्यापूर, अंजनगाव या दोन शहरांसह 156 गावांचा पाणीपुरवठा बुधवार ते शुक्रवार (दि. 5 ते 7) बंद राहील, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कळविली आहे.
दर्यापूर व अंजनगाव ही दोन शहरे आणि 156 गावांच्या सामूहिक पाणी पुरवठ्याची देखभाल- दुरुस्ती आदी काम प्राधिकरणाच्या दर्यापूर उपविभागाकडून होते. या योजनेत स्त्रोत असलेल्या शहानूर धरणावरील मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती होणार असल्याने बुधवार, गुरुवार व शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहील, असे उपविभागीय अभियंत्यांनी कळविले आहे.