*आश्चर्य – स्वातंत्र्य प्राप्ती नंतर तिवसा तालुक्यातील कवाडगव्हाण येथे पोहचली एसटी बस*

0
943
Google search engine
Google search engine

लढा संघटनेच्या जी प सदस्य सौ गौरी संजय देशमुख यांच्या प्रयत्नां ला यश

तीवसा तालुक्यातील कवाडगव्हान येथे देश स्वतंत्र झाल्या पासून st बस पोहचली नव्हती हीच खद खद जनतेच्या मनात होती जी प शाळेचे अध्यक्ष सचिन चौधरी यांनी जी प सदस्य सौ गौरी संजय देशमुख आणि लढा संघटनेचे अध्यक्ष यांच्या कडे मांडली. एसटी महामंडळा च्या अधिकाऱ्यां कडे निवेदन दिले,, त्या नंतर पाठपुरावा केला,,तेंव्हा बुधवारी एसटी गावात पोहचली,,बस गावात पोहचली तेंव्हा फटाके फोडून आणि मिठाई चारून आनंद साजरा करण्यात आला,,गावात तील वृद्ध ते बालगोपाल देखील स्वागतासाठी हजर होते. बस चालक आणि वाहक यांचे या वेळेस दुपट्टा आणि नारळ देऊन स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी जी प सदस्य सौ गौरी संजय देशमुख, लढा संघटनेचे अद्यक्ष संजय देशमुख ,अंकुश गायकवाड आणि गावातील मान्यवर उपस्थित होते.