वॉटर कप ४ च्या जनजागृतीसाठी वर्धा ते मुंबई सायकलवारी. अंकित जयस्वाल यांचा जनजागृतीचा अनोखा उपक्रम !

0
768
Google search engine
Google search engine

वॉटर कप ४ च्या जनजागृतीसाठी वर्धा ते मुंबई सायकलवारी.

अंकित जयस्वाल यांचा जनजागृतीचा अनोखा उपक्रम !

विशेष प्रतिनिधी /

पानी फाउंडेशनच्या चळवळीत तांत्रिक प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अंकित जयस्वाल आज सकाळी वर्ध्याहून आपल्या सायकलवारीची सुरूवात केली. वर्धा ते मुंबई हे अंतर सायकलवर कापताना वाटेत येणाऱ्या गावांमध्ये ते वॉटर कप २०१९ ची जनजागृती करणार आहेत. जवळपास ७६१ किलोमीटरचा प्रवास सायकलवारीवर निघालेल्या अंकित जैस्वाल या युवकाने करण्याचा निर्णय घेतला !

सत्यमेव जयते वॉटर कप च्या जनजागृतीसाठी निघालेल्या तांत्रिक प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेले अंकित जैयस्वाल आज सायंकाळी दारव्हा येथे पोहचले तेथे त्यांचे महसुल प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले.

यामाध्यमातून गाव पाणीदार करण्याचा गावकऱ्यांनी संकल्प करावा असे मत या प्रसंगी व्यक्त केले.
या प्रसंगी महसुल प्रशासनाची संपुर्ण टिम उपस्थित होती.सर्वांनी या प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या !