तावरजखेडा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी कृषी विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून मदत

0
1140
Google search engine
Google search engine

तावरजखेडा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी

कृषी विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून मदत


उस्मानाबाद,दि.:- मौजे तावरजखेडा येथील श्रीपती गंपू फेरे व शिवाजी जनार्दन सगर या शेतकऱ्यांनी बिकट आर्थिक परिस्थिती मुळे आत्महत्या केली.या शेतकरी कुटुंबाची तालुका कृषी अधिकारी श्री.देशमुख, मंडळ कृषी अधिकारी ए. पी. चिक्षे, कृषी सहाय्यक श्री. मगर यांनी भेट घेऊन त्यांना कृषी कर्मचारी संघटनेमार्फत माणुसकीच्या दृष्टीकोनातून आर्थिक मदत केली .तसेच कृषी विभागाच्या शक्य त्या योजनांचा लाभही या कुटुंबाला देण्यात येईल, असे आश्वासनही दिले.

त्याचप्रमाणे या आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, उस्मानाबाद येथे मदत फेरी काढून आर्थिक मदतही गोळा करण्यात आली. ही रक्कम दोन्ही आत्महत्याग्रस्त कुटुंबास देण्यात येणार असून इच्छुकांनी या कुटुंबाला मदत करावयाची असल्यास कृषी सहाय्यक एस.बी .मगर यांच्याशी 9422070515 या मोबाईल वर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.