अमरावती जिल्ह्यातील वलगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या आष्टी गावातील मणिबाई छगनलाल देसाई विद्यालयाची भिंत पडून एका विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू तर, 2 विद्यार्थी गंभीर जखमी आहेत
भिंत कोसळल्याची घटना घडली ती भातकुली तालुक्यातील आष्टी येथील शाळा आहे. मणीबाई छगनलाल देसाई विद्यालय असं या शाळेचं नाव आहे. वर्ग सुरू असताना अचानक या महाविद्यालयाची भिंत कोसळली आणि एका विद्यार्थ्यावर काळाने घाला घातला. या दुर्घटनेत वैभव गावंडे (१३) याचा मृत्यू झाला. तर आणखी 3 विद्यार्थी यात जखमी झाल्याचं समोर आलं आहे. वर्ग सुरु असताना ही घटना घडली. वैभवच्या जाण्याने गावंडे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.