देशातील दहशतवाद हा संपवण्यासाठी शिवनीतीचा वापर केला पाहिजे- शिवव्याख्याते ओंकार औंधे

0
779

राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवनितीचा वापर करून ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे येथील लाल महालात घुसून शाहिस्तेखानाची बोटे छाटली होती व त्याला स्वराज्यातील मावळ प्रांतातून हद्दपार केले होते,तसाच सर्जिकल हल्ला करून पाकिस्तानी दहशतवादाला उत्तर दिले पाहिजे असे मत शिवव्याख्याते ओंकार औंधे यांनी सांगली जिल्ह्यातीलअमारापुर तालुका कडेगांव येथे बोलताना व्यक्त केले.यावेळी बोलत असताना औंधे पुढे म्हणाले की ,छत्रपती शिवाजी महाराजानी आपल्या स्वराज्यात रयतेला व शेतकरी वर्गाला न्याय दिला.शिवरायांचे राज्य हे सर्वसामान्य मराठी मावळ्यांचे व कुणबी वर्गाचे होते.पण आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी राजांच्या नावाने राजकारण केले पण कुणबी व सैनिक वर्गाला न्याय देण्याचे सामर्थ्य राज्यकर्त्यांनी दाखवलं नाही.तसेच ते बोलताना म्हणाले की,आज दुष्काळ या सारख्या समस्येवरती मात करण्यासाठी शिवरायांच्या जलनितीचा मार्ग अवलंबला पाहिजे आणि तरच या सारख्या समस्या मुक्त म्हणून आदर्शवादी महाराष्ट्र घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.शिवरायांनी आपल्या स्वराज्याचा राज्यकारभार हा मराठी भाषेतून केला आणि या मराठी भाषेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या पराक्रमाचा इतिहास सर्वसामान्य लोकांना समजला .तीच मराठी भाषा आज नाहीशी होत आहे म्हणून आता मराठी भाषा वाचवण्यासाठी चलवळ उभारली पाहजे तरच आपला इतिहास जिवंत राहील .या वेळी धनराज मोरे दत्ता मोरे सुरेश शिंगटे अमरदिप मोरे अतुल यादव यांच्या मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते