(म्हणे) ‘पाकने प्रत्युत्तरादाखल आक्रमण केले, तर संघ, सनातन संस्था यांच्या अड्ड्यांवर करावे !’

0
897
Google search engine
Google search engine

हिमाचल प्रदेशातील काँग्रेसचे माजी आमदार नीरज भारती यांचे संघ आणि सनातन यांचा द्वेष करणारे विधान

  • रा.स्व. संघ, बजरंग दल आणि सनातन संस्था यांसारख्या राष्ट्र-धर्मप्रेमी संघटनांविषयी अशी विधाने करणार्‍या पाकप्रेमी काँग्रेसच्या नेत्यांकडून आणखी कोणती अपेक्षा करणार ?
  • राष्ट्रप्रेमी संघटनांना धोकादायक ठरणारी अशी विधाने करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई होण्यासाठी सनातन संस्था अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे.
  • अशा काँग्रेसी नेत्यांवर भाजप सरकारने देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना आजन्म कारागृहात डांबायला हवे !

मुंबई – ‘मला आंनद आहे की, ‘झी न्यूज’च्या वृत्तानुसार भारतीय वायूदलाने केवळ जैश-ए-महंमदच्या आतंकवादी स्थळांना निवडून त्यांना लक्ष्य केले आणि सामान्य पाकिस्तानी नागरिकांना कोणतीही हानी पोहोचवली नाही. मी आशा करतो की, ‘पाकिस्तानही प्रत्युत्तरादाखल आक्रमणाच्या वेळी भारतातील सामान्य नागरिकांना हानी न पोहोचवता केवळ रा.स्व. संघाच्या शाखा, बजरंग दल आणि सनातन संस्था यांच्या अड्ड्यांनाही लक्ष्य बनवावे’, अशी पोस्ट हिमाचल प्रदेशातील काँग्रेसचे माजी आमदार नीरज भारती यांनी नुकतीच त्यांच्या फेसबूक खात्यावर केली होती.