रंगपंचमीच्या दिवशी नैसर्गिक रंगांचीच उधळण करण्यामागील शास्त्र: 

0
1119
Google search engine
Google search engine

रंगपंचमी हा रंगांचा उत्सव. एकमेकांवर रंग उधळून परस्परांमधील प्रेम वृद्धींगत करण्याचा हा दिवस. या वेळी वापरण्यात येणारे रंग हे नैसर्गिक आणि सात्त्विक असावेत, असे शास्त्र सांगते. सध्या मात्र अत्यल्प दरात रासायनिक आणि घातक रंग बाजारात उपलब्ध होऊ लागल्याने लोक त्यालाच पसंती देऊ लागले आहेत; परिणामी हा सण साजरा करणार्‍याला यातून काहीच आध्यात्मिक लाभ होत नाही. रासायनिक रंगामुळे होणारी हानी आणि सात्त्विक रंगांचे लाभ, तसेच नैसर्गिक रंग कसे बनवावेत यांविषयीचे विवेचन या लेखातून केले आहे

१. रासायनिक आणि नैसर्गिक रंगांच्या उधळणीमुळे होणारे परिणाम

१. ‘रासायनिक आणि असात्त्विक रंग सिद्ध करतांना व्यक्‍तीतील अहंभाव त्या वस्तूत उतरतो. त्यामुळे तेथे तमोगुणी कार्यरत वलय निर्माण होते. कोणतीही कृती करतांना त्या व्यक्‍तीतील त्रिगुण त्या वस्तूमध्ये उतरतात आणि त्यातून तशी स्पंदने प्रक्षेपित होतात.

२. रासायनिक द्रव्ये वापरल्यामुळे रासायनिक रंगांमध्ये तमोगुणी वलय कार्यरत होते.

३. रासायनिक रंगांतून मायावी वलयांचे प्रक्षेपण होते. तसेच रंगांमधील विविधता व्यक्‍तीचे मन आकर्षित करून घेते. त्यामुळे व्यक्‍तीचे मन मायेतील विचारांमध्ये रमू लागते.

४. वायूमंडलातील काळे प्रवाह रासायनिक रंगात आकृष्ट होतात आणि त्यांचे वातावरणात प्रक्षेपण होते.

५. रासायनिक रंगांमध्ये तमप्रधान काटेरी कण आणि मायावी कण कार्यरत होतात. त्यामुळे त्यात ईश्‍वरी चैतन्य आकृष्ट करण्याची क्षमता नसते.

६. रासायनिक रंगांभोवती काळ्या आवरणाचा थर असतो.

७. वातावरणात काटेरी कण पसरतात आणि त्यामधून तमप्रधान काळ्या वलयांचे प्रक्षेपण होऊन वातावरण दूषित बनते.

आ. सात्त्विक रंगांची उधळण केल्यामुळे होणारे लाभ

वातावरण

‘होळीच्या दिवशी होळी प्रज्वलन झाल्यामुळे वातावरणातील रज-तमप्रधानतेचे प्रमाण न्यून होते. होळीपासून पाचव्या दिवशी येणारी सकाळ म्हणजे रंगपंचमी. या दिवशी पृथ्वीवरील रज-तमप्रधानतेचे प्रमाण अल्प होते.

१. ब्रह्मांडातून निर्गुण तत्त्व एका रेषेत पृथ्वीवर येते.

१ अ. ते वातावरणात एका वलयाच्या रूपात विद्यमान असते.

२. आनंदाचा प्रवाह आणि तेजतत्त्वात्मक शक्‍तीचे कण पृथ्वीवर आकृष्ट होतात.

३. ईश्‍वरी चैतन्याचा प्रवाह पृथ्वीवर येणे
या दिवशी वातावरणात सात्त्विक रंगांची उधळण करण्यात येते, तेव्हा या सात्त्विक रंगांच्या माध्यमातून रंग आणि गंध यांचे कण वातावरणात पसरतात. त्या वेळी ते वातावरणात कार्यरत झालेले ईश्‍वरी चैतन्य आकृष्ट करतात.

३ अ. वातावरणात हे ईश्‍वरी चैतन्य वलयांच्या रूपात कार्यरत असते.

४. तेजतत्त्वात्मक शक्‍तीचे कण पृथ्वीवर आकृष्ट होतात. सात्त्विक रंगांची उधळण करणार्‍या व्यक्‍तीला ईश्‍वरी निर्गुण चैतन्याचा सगुण स्तरावर लाभ होणे
रंगांची उधळण करण्यासाठी सात्त्विक रंग, उदा. हळद, गुलाल इत्यादी वापरल्याने त्यांच्यात ईश्‍वरी चैतन्य आकृष्ट करण्याची क्षमता असते. त्यामुळे ते ईश्‍वरी निर्गुण चैतन्य आकृष्ट करतात आणि त्याचा सगुण स्तरावर व्यक्‍तीला लाभ करून देतात. ही क्षमता रासायनिक रंगांमध्ये नसते.

इ. रंग उधळण्याच्या कृतीनंतर होणारा परिणाम

५. वातावरणात कार्यरत असणार्‍या निर्गुण तत्त्वाच्या वलयातून निर्गुण तत्त्वात्मक कण काही प्रमाणात वातावरणात पसरतात.

६. ईश्‍वराकडून आकृष्ट झालेल्या आनंदाच्या प्रवाहामुळे वातावरणात आनंदाचे वलय निर्माण होते आणि त्यातून आनंदाच्या प्रवाहांचे प्रक्षेपण होते.

७. गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार आनंद आणि चैतन्य यांचे कण रंग उधळणार्‍या व्यक्‍तीकडे आकृष्ट होणे:
आनंदाच्या प्रवाहांच्या माध्यमातून वातावरणात आनंदयुक्‍त ईश्‍वरी तत्त्वाचे कण पसरतात. सात्त्विक रंग वातावरणात उधळल्यावर त्यातील कण वातावरणात पसरतातच; पण ते रंग उधळणार्‍या व्यक्‍तींकडेही पुन्हा आकृष्ट होतात, उदा. एखादा चेंडू आकाशात फेकला असता गुरुत्वाकर्षण नियमानुसार तो पुन्हा भूमीकडे येतो, अगदी त्याचप्रमाणे ही कृती घडते. रंगांनासुद्धा गुरुत्वाकर्षण नियम लागू असल्याने चैतन्य आणि आनंद यांचे कण व्यक्‍तीकडे आकृष्ट होतात.

८. तेजतत्त्वात्मक शक्‍तीचे कण रंगांच्या माध्यमातून वातावरणात पसरतात.

९. ते तेजतत्त्वात्मक शक्‍तीचे कण थोड्या प्रमाणात कार्यरत असणार्‍या अनिष्ट शक्‍तींशी लढण्याचे कार्य करतात.

१०. सात्त्विक रंगांची उधळण केल्याचा व्यक्‍तीतील भावानुसार तिला लाभ होतो.

११. व्यक्‍तीमध्ये आनंदाचे आणि चैतन्याचे वलय निर्माण होते.

१२. शक्‍तीचे कणसुद्धा व्यक्‍तीच्या देहात पसरून देहावरील काळे आवरण दूर होते.’

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा

२. होळीचे रंग बनवण्याची पद्धत

‘झाडाची पाने, फुले, हळद, खनिज या माध्यमातून रंगाची निर्मिती होते. लहानसहान कीटकांपासून काही रंग सिद्ध होतात. लाख नावाच्या किड्यापासून लेकोइक आम्ल मिळवले जाते. या आम्लावर रासायनिक प्रक्रिया करून लाल रंग बनवतात. समुद्रात आढळणार्‍या शंख-शिंपल्यातील कीटकांपासून पांढरा रंग बनवला जातो. हा रंग सूर्यप्रकाशात हळूहळू हिरवा, त्यानंतर निळ्या रंगात रूपांतरित होतो. मेक्सिकोमध्ये कार्मीन रेड या कीटकापासून द्राव्य बनवले जाते. त्यासाठी कीटकांना चांगले सुकवून त्यांची बारीक पावडर बनवली जाते.

रंगामध्ये प्रामुख्याने शिसे, पोटॅशियम डायक्रोमेट, बोरिक पावडर, कास्टीक सोडा, ब्लिचिंग पावडर, झिंक ऑक्साईड, ऑक्झालिक अ‍ॅसिड, तसेच इतर रासायनिक मिश्रणाचा वापर केला जातो.’

३. नैसर्गिक रंग बनवण्याची पद्धत
अ. लाल रंग

‘लाल चंदनाची (रक्‍तचंदनाची) भुकटी (पावडर) कोरड्या लाल रंगाच्या रूपात वापरू शकतो. ती त्वचेसाठी लाभदायक आणि सौंदर्यवर्धक आहे. एक लिटर पाण्यात दोन चमचे लाल चंदनाची भुकटी टाकून ते पाणी उकळल्याने लाल रंग बनतो. यात आवश्यकतेनुसार पाणी मिसळू शकतो.
अ १. ओला लाल रंग

१. दोन चमचे लाल चंदन पावडर १ लिटर पाण्यात उकळल्यावर सुंदर लाल रंग बनतो.

२. लाल डाळिंबाच्या साली पाण्यात उकळल्यावरही लाल रंग बनतो.

आ. कोरडा हिरवा रंग

१. हा रंग केवळ मेंदी पावडर किंवा मेंदी पावडर कणकेत मिसळून बनवलेल्या मिश्रणाचा उपयोग करून करता येतो. कोरड्या मेंदीने त्वचा लाल होण्याची भीती नसते. हे मिश्रण पाण्यात मिसळून लावले, तरच त्वचा लाल होईल.

२. मेंदी पावडरसमवेत आवळ्याची पावडर मिसळली, तर भुरकट रंग बनतो. तो केसांसाठी चांगला असतो.

आ १. ओला हिरवा रंग

दोन चमचे मेंदी पावडर एक लिटर पाण्यात चांगल्या प्रकारे मिसळल्यावर हा रंग बनतो.

इ. कोरडा पिवळा रंग
चार चमचे बेसनामध्ये (चण्याच्या डाळीच्या पिठात) दोन चमचे हळद पावडर मिसळल्याने उत्तम पिवळा रंग बनतो. हा त्वचेसाठी उत्तम प्रकारे उटण्यासारखे कार्य करतो. सामान्य हळदीच्या जागी कस्तुरी हळदीचा वापरही करू शकतो. ती अतिशय सुगंधी असते. तसेच बेसनाच्या जागी कणिक, मैदा, तांदुळाचे पीठ, आरारुट किंवा मुलतानी मातीचाही उपयोग करू शकतो.
इ १. ओला पिवळा रंग

१. दोन चमचे हळदीची पावडर दोन लिटर पाण्यात टाकून चांगल्या प्रकारे उकळल्यास गर्द पिवळा रंग बनतो.

२. अमलतास, झेंडू यांसारखी पिवळी फुले रात्री पाण्यात भिजवून सकाळी उकळल्यावर पिवळा रंग बनतो.

उ. जांभळा रंग
बीट पाण्यात उकळवून वाटल्यास उत्तम जांभळा रंग बनतो.
ऊ. काळा रंग
आवळाचूर्ण लोखंडाच्या भांड्यात रात्रभर भिजवल्याने काळा रंग बनतो.’