‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने चंडीगड येथील आंतरराष्ट्रीय ज्योतिष महासंमेलनात मार्गदर्शन
चंडीगड – उपासना (साधना) करणा
सौ. मुंजाल पुढे म्हणाल्या की, जशी साधना वाढत जाते, तशी मनाची एकाग्रता वाढून ईश्वराच्या कृपेने, म्हणजे ईश्वरेच्छेने, म्हणजेच ईश्वराशी अंशात्मक एकरूप होण्याने ज्योतिषाला अचूक भविष्य वर्तवता येणे शक्य होते. यामुळेच संतांना ज्योतिषशास्त्राचा अभ्यास नसतांनाही अचूक भविष्य सांगता येते. साधनेतील प्रगतीनुसार हळूहळू अचूकता येण्याचे प्रमाण वाढते. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९९१ मध्ये सांगितल्यानुसार चांगले ज्योतिषी बुद्धीने ३० टक्के आणि साधनेमुळे आतून सुचल्याने ७० टक्के भविष्य सांगू शकतात.
‘भविष्यात सांगितल्याप्रमाणे होणार असले, तर प्रयत्न कशाला करायचे ?’, असा प्रश्न काहींच्या मनामध्ये येतो. त्याविषयी सौ. मुंजाल म्हणाल्या की, फलज्योतिष हे शास्त्र आहे. यासंदर्भात पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत –
अ. मानवी जीवनातील ६५ टक्के घटना प्रारब्धानुसार, तर ३५ टक्के घटना क्रियमाण कर्मानुसार घडतात. ‘कोणती घटना प्रारब्धानुसार घडणार आहे ? आणि कोणती घटना क्रियमाण कर्मानुसार घडणार आहे ?’, हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे प्रयत्न करणे योग्य ठरते.
आ. प्रारब्धानुसार घडणार्या घटनांपैकी ३० टक्के घटना, उदा. मृत्यू (महामृत्यूयो
ज्योतिषी केवळ शास्त्र सांगू शकतात; पण ते एखाद्याला वाचवू शकत नाहीत. संत एखाद्याला आध्यात्मिक उपाय सांगून त्यांना होणार्या त्रासाची तीव्रता निश्चितच कमी करू शकतात,असे सौ. मुंजाल यांनी या विषयाचा समारोप करतांना सांगितले.