अचूक भविष्य वर्तवण्यासाठी ज्योतिषांनी नित्य साधना करणे आवश्यक !

0
756

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने चंडीगड येथील आंतरराष्ट्रीय ज्योतिष महासंमेलनात मार्गदर्शन

 चंडीगड  उपासना (साधनाकरणार्‍या ज्योतिषांच्या भाकितांमध्ये जी अचूकता असतेती अचूकता पुस्तकी पंडित असलेल्या ज्योतिषांच्या भाकितात नसतेत्यांची भाकिते अतिशय मोघम असतातकित्येकदा ती चुकतातसुद्धा याचे कारण आहे कीपुस्तकी पंडित ज्योतिषांना केवळ प्रारब्ध कर्माला अनुसरून भविष्य सांगता येतेतर साधना करणार्‍या ज्योतिषांना क्रियमाण कर्माला अनुसरूनही भविष्य सांगता येतेकेवळ पुस्तकी माहितीच्या आधारे भाकिते अचूक ठरू शकत नाहीतउपासना (साधनाकरणार्‍या ज्योतिषांची भाकिते मात्र तंतोतंत खरी झालेली आढळून येतातअसे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या सौसंदीप कौर मुंजाल यांनी केले. ‘श्रीमुख ज्योतिष संस्थान’ यांनी २२ ते २४ मार्च या कालावधीत चंडीगड येथे ‘आंतरराष्ट्रीय ज्योतिष महासंमेलना’चे आयोजन केले होते.त्यामध्ये सौमुंजाल यांनी २३ मार्च या दिवशी ‘अचूक भविष्य वर्तवण्यासाठी नित्य साधना करणे आवश्यक !’ या विषयावर ज्योतिषांना संबोधित केलेमहर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉआठवले यांच्या मार्गदर्शनानुसार ज्योतिष फलित विशारद सौप्राजक्ता जोशी यांनी या विषयाचे लेखन केले आहे.

      सौमुंजाल पुढे म्हणाल्या कीजशी साधना वाढत जातेतशी मनाची एकाग्रता वाढून ईश्‍वराच्या कृपेनेम्हणजे ईश्‍वरेच्छेनेम्हणजेच ईश्‍वराशी अंशात्मक एकरूप होण्याने ज्योतिषाला अचूक भविष्य वर्तवता येणे शक्य होतेयामुळेच संतांना ज्योतिषशास्त्राचा अभ्यास नसतांनाही अचूक भविष्य सांगता येतेसाधनेतील प्रगतीनुसार हळूहळू अचूकता येण्याचे प्रमाण वाढतेमहर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉआठवले यांनी वर्ष १९९१ मध्ये सांगितल्यानुसार चांगले ज्योतिषी बुद्धीने ३० टक्के आणि साधनेमुळे आतून सुचल्याने ७० टक्के भविष्य सांगू शकतात.

      ‘भविष्यात सांगितल्याप्रमाणे होणार असलेतर प्रयत्न कशाला करायचे ?’, असा प्रश्‍न काहींच्या मनामध्ये येतोत्याविषयी  सौमुंजाल म्हणाल्या कीफलज्योतिष हे शास्त्र आहेयासंदर्भात पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत 

मानवी जीवनातील ६५ टक्के घटना प्रारब्धानुसारतर ३५ टक्के घटना क्रियमाण कर्मानुसार घडतात. ‘कोणती घटना प्रारब्धानुसार घडणार आहे आणि कोणती घटना क्रियमाण कर्मानुसार घडणार आहे ?’, हे आपल्याला कळत नाहीत्यामुळे प्रयत्न करणे योग्य ठरते.

प्रारब्धानुसार घडणार्‍या घटनांपैकी ३० टक्के घटनाउदामृत्यू (महामृत्यूयोअटळ असतात.कितीही प्रयत्न केलेतरी त्यांच्यावर मात करता येत नाहीमात्र ‘महामृत्यूयोग आहे कि नाही’हे आपल्याला कळत नसल्याने प्रयत्न करणे योग्य ठरतेउरलेल्या ७० टक्के घटनांवर योग्य साधनेने मात करता येते.

       ज्योतिषी केवळ शास्त्र सांगू शकतातपण ते एखाद्याला वाचवू शकत नाहीतसंत एखाद्याला आध्यात्मिक उपाय सांगून त्यांना होणार्‍या त्रासाची तीव्रता निश्‍चितच कमी करू शकतात,असे सौमुंजाल यांनी या विषयाचा समारोप करतांना सांगितले.