चांदुर रेल्वे – (शहेजाद खान .)
सगळीकडे वृक्षारोपन होत असतांना शहरातील आझाद मंडळातर्फे वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न झाला.
राज्यभरात लोकसहभागातून वृक्षलागवडीचे ‘हरित मिशन’ राबविले जात असतांना स्थानिक आझाद मंडळातर्फेसुध्दा शहरात वृक्षलागवड करण्यात आली. पाणी टंचाईवर मात आणि पर्यावरणाचे रक्षण करणे यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायले हवेत असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. यावेळी आझाद मंडळाचे राजु कलावटे, वैभव पांडे, सौरभ कलावटे, लुकेश पतरीया यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.