बडतर्फ पोस्ट कर्मचाऱ्याना पुन्हा सेवेत घेण्याचे औरंगाबाद उच्च न्यायालयाचे आदेश

0
753
Google search engine
Google search engine

  

 

औरंगाबाद –  नोहेंबर २०१६ मध्ये भारतीय पोस्ट खात्याने तडका फडकी आदेश काढून ३९५ पोस्टमन/मेलगार्ड पदावर रुजू असणाऱ्या कर्मचाऱ्याना निलंबित केले तसेच निवड झालेल्या उमेदवारांची निवड रद्द केली.

याच विषयाचा संदर्भात सदर कर्मचाऱ्यानि अधिवक्ता स्वप्नील तावशिकर यांचे मार्फत मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल केल्या सदर सुनावणी दिनांक ०२-०८-२०१७ म्हणजे आज झाली याचिका कर्त्यांचे वतीने अधिवक्ता श्री विनायक दीक्षित व अधिवक्ता श्री स्वप्नील तावशीकर यांनी याचिका कर्त्यातर्फे बाजू मांडली तसेच त्यांना अधिवक्ता मझहर जहागीरदार व अधिवक्ता फरहान पटेल यांनीही सहाय्य केले.