अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-
* नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन मा.मुख्यमंत्री यांना मा.उपविभागिय अधिकारी, अचलपुर यांच्यामार्फत शनिवार दि. ३ ला देण्यात येत आहे.
याप्रसंगी_प्रितेश अवघड यांनी म्हटले की समाजप्रबोधन करणे हे एक समाज जागृती चे कार्य सत्यपाल महाराज करीत असून त्यांच्यावर झाले हा हल्ला म्हणजे संपूर्ण परिवर्तन वादी समाजावर झालेला हल्ला होय अशा शब्दात निषेध करून पुढील मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे.त्यांचे सोबत झालेल्या या भ्याड हल्ल्याविरूध्द पुढील प्रमुख मागण्या:-१) श्री सत्यपाल महाराज यांच्यावर हल्ला करणा-या आराेपीवर कलम ३०७ अंतर्गत कार्यवाही करण्यात यावी २) श्री सत्यपाल महाराज यांना पाेलीस सुरक्षा प्रदान करावी ३) श्री सत्यपाल महाराज यांना महाराष्ट्र भूषण प्रदान करावे.निवेदन उपविभागीय अधिकारी अचलपूर यांना आज सादर करण्यात येणार आहे. या जनहितार्थ मागणिसाठी दि.१ गुरूवार ला सकाळी ८ वाजतापासुन, सायंकाळी ५ वाजेपर्यत निषेध स्वाक्षरी अभियान घेण्यात आले, या अभियानाला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला व या भ्याड हल्याचा अतिशय तिव शब्दात निषेध नाेंदविला. या निषेध स्वाक्षरी अभियानाच्या यशस्वीते करता मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रितेश अवघड, शहर अध्यक्ष विवेक महल्ले, शहर उपाध्यक्ष भूषण नागे,पंकज पर्वतकर,सागर डांगे,किरण लाखपुरकर, अंकुश इंगळे,दिनेश पवार,राेहित खडसे,राज बरडे,रितेश काठाेडे, आदि कार्यकत्यांनी अथक परिश्रम घेतले.