बिहारमध्ये पुरामुळे ५६ जणांचा मृत्यू

0
536
Google search engine
Google search engine

पाटलीपुत्र – बिहारमध्ये ७० लाख लोक पूरग्रस्त झाले आहेत. तसेच या पुरामध्ये आतापर्यंत ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील १३ जिल्ह्यांत पूर आला आहे. सरकारने पूरग्रस्तांसाठी ३४३ साहाय्यता केंद्रे स्थापन केली आहेत. येथे ८५ सहस्र पूरग्रस्तांना ठेवण्यात आले आहे. राज्यात सैन्यासमवेत राष्ट्रीय आपत्कालीन रक्षण पथक बचाव कार्य करत आहेत.