तुर खरेदी बाबद शासन शेतकऱ्यांची दिशाभूल करित आहे.- विष्णुपंत भुतेकर

0
1370

महेंद्र महाजन जैन / रिसोड 

रिसोड: तुर खरेदी बाबद शासनआणि प्रशासन सातत्याने  शेतकऱ्यांची  दिशाभूल करित आहे प्रत्येक तालुक्यात चार हजार शेतकर्यानी नाव नोंदणी केली परंतु गेल्या आठ दिवसापासुन केवळ ३५ ते४० लोंकाची मोजणी नाफेड द्वारा करण्यात आली त्यातुन तुर खरेदी चा प्रामाणिक पणा उघड होतो सर्वच मालाचे भाव पडल्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे त्यात तुर खरेदीत शासन सातत्याने दिशाभूल करित आहे शेतकर्याच्या प्रती शासनाला आणि सत्तेत बसलेल्यांना कुठलीही आस्था राहली नसल्याची प्रतीक्रीया विष्णुपंत भुतेकर यांनी दिली
ह्या सर्व बाबीच्या तथा शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी शिवसंग्राम जिल्हाभर आंदोलन करणार
असल्याचे प्रसिद्धी पञात म्हटले आहे