अमरावती :
महाराष्ट्राच्या हिताची बाब असेल तर श्री शरद पवार यांनी मतांची चिंता कधीच केली नाही. वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आणि चुका दुरुस्त करणारे श्री शरद पवारच आहेत, असं म्हणत मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार यांचं तोंडभरुन कौतुक केलं. कपटी मित्रापेक्षा दिलदार विरोधक केव्हाही बरा, असंही मुख्यमंत्री म्हणाले.