फेरीवाल्यांच्या प्रश्नी महात्मा नाना पाटेकर यांनी चोंबडेपणा करू नये! – श्री राज ठाकरे

0
1272
Google search engine
Google search engine

‘फेरीवाल्यांच्या प्रश्नावर नाना पाटेकरांनी उगाच चोंबडेपणा करू नये, ज्या विषयाची त्यांना माहिती आहे त्याबद्दलच त्यांनी बोलावे’, अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाटेकर यांच्या वक्तव्याच्या तिखट समाचार घेतला. दक्षिणेतील कलाकार रस्त्यावर उतरून स्वतःच्या प्रांतासाठी लढतात तसे नानानेसुद्धा महाराष्ट्रासाठी लढावे, असे सांगत ‘आपल्या राज्यासाठी जो लढतो त्याचेच नाव इतिहास लक्षात ठेवतो’, असे राज ठाकरे यांनी बजावले.

फेरीवाल्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी नाना पाटेकर यांच्या भूमिकेची खिल्ली उडविली. ‘महात्मा नाना पाटेकरांनी फेरीवाल्यांबद्दल काहीतरी वक्तव्य केले आहे. नानाला वाटते तो चंद्रावरून पडलाय. जेव्हा मराठी सिनेमांना स्क्रीन मिळत नव्हती तेव्हा नाना पाटेकर बोलले नाहीत, तेव्हा मनसेने लढा दिला. नानाला सरकारने करावे असे वाटते. मग पाण्याचा प्रश्नही सरकारनेच सोडवावा. त्यासाठी त्याने कशाला संस्था काढली’, असा सवाल राज यांनी केला.