चिखलदरा :-
आज सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास चिखलदरा वरून परतवाडा कडे जाणाऱ्या एस टी बस चा अपघात झाला असून सुदैवाने कोणती मोठी अनुचित घटना घडली नाही. सर्व प्रवाशी सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे.
प्राप्त माहितीनुसार एम एच -४० /८८४६ या क्रमांकाची बस चिखलदरा वरून परतवाडा साठी मोथा मार्गे येत असताना धामणगाव गढी येथे शिवमंदिर खालच्या वळण रस्त्यावर अचानक ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. एस टी बस मध्ये अंदाजित २५ ते ३० प्रवाशी असल्याची माहीती आहे.
या अपघातामुळे पुन्हा एकदा परिवहन विभाग मेळघाटात भंगार गाड्या पाठवून मेळघाट वासियांचे जीव धोक्यात टाकण्याचे काम करत असल्याचे सिद्ध झाले.