परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९९८ मध्ये ‘वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होईल’, असे सांगितले होते. भगवंताची वाणी महापुरुषांना ऐकू येते. आपण भाग्यवान आहोत की, ईश्वराची वाणी संतांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळत आहे. येणारा काळ महाभयंकर असेल; मात्र या काळात हिंदू संघटित होतील आणि एक दिवस या राष्ट्राचे हिंदु राष्ट्रात परिवर्तन होईल. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रत्येक हिंदूला या कार्यात सहभागी होण्यासाठी संधी दिली आहे. वर्ष २०२३ साठी आणखी ६ वर्षे शिल्लक आहेत. त्यामुळे हातावर हात धरून न बसता प्रत्येक हिंदूने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करायला हवा.