देशाला ‘हिंदु राष्ट्र’ बनवण्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रपती होणे आवश्यक ! – उद्धव ठाकरे

0
617
Google search engine
Google search engine

संभाजीनगर –

 भारत हिंदु राष्ट्र व्हावे, अशी इच्छा आहे. अनेक वर्षांनी देशात सत्तापरिवर्तन झाले आहे. आता हिंदु राष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रपती होणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरावे, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
श्री. ठाकरे हे ७ मे या दिवशी संभाजीनगर जिल्ह्याच्या दौर्यारवर आले असता पत्रकारांशी बोलत होते.