भारतातील एकतरी राजकारणी असे कधी बोलतो का ? स्वतःला हिंदुत्वनिष्ठ म्हणवणारे तथाकथित नेतेही कधी असे बोलत नाहीत !
लक्ष्मणपुरी – प्रभु श्रीरामाचे नाव घेतल्याविना कोणतेही काम पूर्ण होणार नाही. प्रभु श्रीराम हे आमच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. देशाच्या पूर्ण आस्थेचे केंद्रबिंदू भगवान राम आहेत, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. उत्तरप्रदेशमधील पालिका निवडणुकीच्या प्रसारसभेत ते बोलत होते. पालिका निवडणूक आमच्यासाठी एक प्रकारची परीक्षा आहे. आजपर्यंत केलेल्या कामाची पोचपावती म्हणून आम्ही पालिका निवडणुकीतील निकालाकडे पहातो, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले. या निवडणुकीत योगी आदित्यनाथ हे १२ दिवसांत ३३ सभा घेणार आहेत.